भगवान सेनेच्या निर्मितीमुळे बिथरलेल्या काही लोकांनी राजकीय हेतुने जिल्ह्यात काही अनिष्ठ गोष्टी घडुन आणल्या परिणामी बहुजन समाज विशेषथा वंजारी समाज बिथरला त्याचा परिणाम भगवान सेनेच्या माध्यमातून वंजारी समाजात एक सामाजिक व राजकीय भान आले. संपूर्ण बीड जिल्ह्यात भगवान सेना नावाच्या संघटनेची आदरयुक्त भिती निर्माण झाली होती. याचा योग्य फायदा लोकनेते मुंडे साहेबांनी घेतला. शिवाजी वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या हतेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात राजकीय व सामाजिक अस्थिरथा निर्माण झाली. परिणामी लोकनेते मुंडेसाहेबांनी ही संघटना पुर्ण ताब्यात घेतली व 1993 ला पहिल्यांदा त्यांनी भगवान गडावर सामाजिक दृष्टया पहिला कार्यक्रम घेतला. तेंव्हा पासून दरवर्षी विजय दशमीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री बबनराव ढाकणे, माजी मंत्री तुकाराम डिघोळे हे मान्यवर एकाच व्यासपीठावर येवु लागले.
1995 ला राज्यात सत्ता परिवर्तन झाले. गडाला राजकीय पाठबळ मिळाले. 1996 साली भगवान बाबांचे जन्मशताब्दी वर्षे होते. त्या निमित्ताने एक ऐतिहासिक अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला. ज्या सप्ताहाचे संपुर्ण नेतृत्व आजचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. वास्तवीक भिमसिंहबाबा यांनी या संपुर्ण कार्यक्रमाची सुत्रे शास्त्रीकडे दिली होती. या सप्ताहानंतर 1997 ला सावरगाव या बाबांच्या मुळ जन्मगावी पुन्हा एक सप्ताहा झाला. त्याचे नियोजक स्वत: मुंडे साहेबांनी शास्त्रीवर सोपवले होते. एकीकडे अध्यात्मिक बाबतीत गडाची किर्ती वाढत असतांना दुसरीकडे मात्र गडावरच्या राजकीय भुमीकेला महत्व येवु लागले होते. 1999 ला राज्यातली युतीची सत्ता गेली होती. परंतू लोकनेते मुंडे यांनी भगवान गडाच्या माध्यमातून संपुर्ण ऊस तोडणार्या समाजावर आपला प्रभाव निर्माण केला होता.
2003 साली नोव्हेंबर महिण्यात अचानक भिमसिंह बाबांचे आजारात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातल्या समाजाच्या मनात असलेल्या नामदेव शास्त्रींना सर्वा समक्ष या गादीचा वारसदार म्हणून तत्कालीन गडाच्या तत्कालीन कार्यकारी मंडळाने बसवल्याचे जाहीर केले या वेळी मुंडे साहेब गडाचे ट्रस्टी नव्हते. मात्र ते समाजाचे नेते झाले होते.त्यामुळे समाजाच्या वतीने मुंडे साहेबांनी शास्त्रींच्या नावाची घोषणा केली तेंव्हापासून आजपर्यंत या पदावर शास्त्रींच्या काळात जे दसरा मेळावे झाले. त्या दसरा मेळाव्या बद्दल एक वेगळे सामाजिक समिकरण आपल्याला पहावयास मिळू शकते. राज्यातील सत्ता गेली होती. सत्तेत असतांना भगवान गड हे माझे श्रध्दास्थान आहे असे साहेबांनी जाहीर केले होते. त्यामुळे एक भक्त म्हणून भगवान गडाच्या विकासात त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. भगवान बाबांनी अत्यंत कष्टातून उभ्या केलेल्या या गडाचा, गादीचा अथवा महंताचा अनादर होईल असे कधीही विधान केले नाही किंवा त्यांच्या समर्थकांनाही कधीच त्यांच्या परस्पर गडाबद्दल अथवा महंताबद्दल वाईट बोलण्याची हिम्मत केली नाही. त्यामुळे भगवानगड व गोपीनाथ मुंडे हे एक समिकरण बनले होते.
प्रत्येक वर्षी दसर्याच्या पंधरा दिवसा अगोदर गडावर कोणत्या पक्षाचा अथवा कोणत्या गटाचा, कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नेता आणायचा याचा संपूर्ण निर्णय स्वत: मुंडे साहेब घेत होते.काही दिवसांनी गडाची कार्यकारणी मंडळ मिटींग झाल्यास या गडाच्या ट्रस्टला अध्यक्ष म्हणून गोपीनाथ मुंडे हे न्याय देवु शकतील असा विश्वास डॉ.नामदेव शास्त्री यांना वाटला व त्यामुळे त्यांनी स्वत: लोकनेते मुंडे साहेबांना अध्यक्ष होण्यासाठी सुचना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भगवान गड हे मुंडे यांच्या बरोबरच राज्यात्ल्या अनेक लोकांचे श्रद्धेचे ठिकाण बनले. त्यांच्या अनेक भुमीका गडावरुन राज्यातल्या लोकांनी पाहिल्या . त्यांना कधी मुंबई दिसली कधी दिल्ली दिसली व शेवटच्या सभेत त्यांना स्वत:ची कन्याही दिसली व त्यांच्या प्रत्येक भुमीकेत गडाने कायम सकारात्मक विचार करीत त्यांना आशिर्वाद दिला. मुंडे साहेबांना गड एकतर्फी मदत करतो यामुळे इतर पक्षातल्या नेत्यांनी व त्या नेत्याबरोबर काम करणार्या समाजतल्या अनेक लोकांनी दसर्या दिवशी गडावर येणे बंद केले. गडाची प्रतिमा हळु हळु वंजारी समाजाचा गड अशीच बनली. या गोेष्टीचा प्रचंड त्रास महंतांना सहन करावा लागला. तरीही आपण योग्य मानसाच्या पाठीशी उभे आहोत या भुमीकेतून डॉ.नामदेव शास्त्री यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या भुमिकेचे समर्थन केले. परिणामी त्यांना त्याचा त्रासही सहन करावा लागला. गोपीनाथ मुंडे यांची उंची लक्षात घेतांना त्यांची व गडाची भक्ती लक्षात घेतांना त्यांचे भाषण राजकीय होते की, सामाजिक होते. यापेक्षा राज्यातल्या सर्व भागात आदरयुक्त भीतीचे होते हा मॅसेज गेल्यामुळे त्यांना सर्वांनी स्विकारले त्यांच्या आकाली जाण्याने मात्र आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
2014 च्या दसरा मेळाव्यात गडाने राजकीय फायदयासाठी गड वापरला म्हणून गडाच्या ट्रस्टीसह महंतावर गुन्हा दाखल झाला. तब्बल तीन महिणे महंत फरार होते. या काळात त्यांची साधी चौकशी करण्याची सुद्धा कुणाला गरज वाटली नाही. त्यानंतर गडाच्या विकासात आपले फार मोठे योगदान आहे. या अविरभावात काही लोकांनी गड म्हणजे आपली खाजगी मालमत्ता आहे ही भुमीका घेण्यास सुरुवात केली. परिणामी अत्यंत थंड डोक्याने भगवान गडाच्या कार्यकारी मंडळाने भगवान गडावर राजकीय भाषण बंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतांना महंताने वारसदारा बरोबर अनेक वेळा चर्चा केली. डिसेंबर 2015 साली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे, रावसाहेब दानवे यांच्या समक्ष भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथगडाला शुभेच्छा देवुन या नंतर राजकीय भुमीका या गडावरुन तर धार्मीक भुमीका भगवानगडावरुन ठरेल व त्यामुळे राजकीय कोंडीत सापडलेला भगवान गड मोकळा श्वास घेईल असे जाहीर केले होते. तेंव्हा हजारो बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवुन याचे स्वागत केले होते. मात्र प्रत्यक्ष दसरा जसा-जसा जवळ येवु लागला तस-तसा सोशल मिडीयावर काही लोकांनी वाद घालण्यास सुरुवा केली. दोन्ही नेतृत्वाने ठरवुन घेतलेला निर्णय असतांना हा वाद निर्माण का केला गेला हे लोकांना कळु शकले नाही. परिणामी गेल्या वर्षी दसर्याच्या अगोदर सहा महिण्यापुर्वी कोठारबन तालुका वडवणी या गावात झालेल्या वार्षीक नारळी सप्ताहात संपुर्ण राजकीय भाषण बंदी हा ठराव घेण्यात आला व तो आमलातही आणला गेला. या गोष्टीचा काही अंध भक्तांना प्रचंड राग आला व तब्बल पाच महिणे महंतांना खालच्या स्तरावर जावुन शिव्या देण्यात आल्या. वास्तविक वारसदाराने एक पोष्ट करुन हा चालेला सामाजिक गोंधळ थांबवु शकल्या असत्या मात्र आपले कडवे समर्थक कोणत्या टोकाला जावु शकता हे लोकांना दिसावे यासाठी प्रोत्साहन दिले. ठरावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व सामाजिक अस्थर्य निर्माण केले. परिणामी गडावर होणारा दसरा पायथ्यावर आला कार्यक्रमात बाहेरच्या लोकांना बोलवुन महंताला व या वादाशी संबंध नसलेल्या नेत्यांना शिव्या देण्यात आल्या एक वर्षात बरेच पाणी वाहुन गेले.
आता पुन्हा एकदा दोन दिवसावर दसरा आला आहे. गेल्या एक महिण्यापासून पुन्हा तोच विषय चर्चेत आणुन युवकांचे डोके भडकावले जावु लागले आहे. गेल्या वर्षी निघालेले मराठा मोर्चे, टप्प्यात आलेल्या नगर पालीका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, ओबीसी समाजात असुरक्षीतेची भावना या सर्व गोष्टीचा एकत्रीत मिलाप झाला व गडाच्या पायथ्याला लोक जमवण्यासाठी दसरा मेळाव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाड्याच्या गाड्या लावुन मानसे जमवण्यात आले आपल्या पाठीमागे फार मोठा जमाव आहे असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. त्याच वातावरणातून आजुन बाहेर निघाले नाही परिणामी यावर्षी पुन्हा असे काही करता येते का याचा प्रयत्न सुरु झाला. फार प्रयत्न करुनही वातावरण तापत नाही असे लक्षात आल्यानंतर युद्धात जिंकण्यासाठी वापरावयाचे शेवटचे हत्यार म्हणजे भावनीक वातावरण व आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातुनच अहंकारी भाषेतले पत्र महंतांना प्राप्त झाले आहे. ज्या पत्रातली भाषा मुलीने बापाला लिहीली असु शकत नाही तर सासरच्या त्रासाला वैतागलेली एकादी विवाहीता आत्महत्या करतांना या पद्धतीने पत्र लिहीते अशी ही भाषा आहे. त्या पत्रात ना भावनिक ओलाव आहे ना आत्मीक प्रेम समाजाच्या नावावर गेल्या तीन वर्षात कोणत्याच स्टेशनवर आथवा टॅक्सी स्टॅन्डवर न दिसलेला समाज या पत्रामुळे आम्हाला दिसला. ज्या गडावर भगवान बाबा आहे तीच समाजाची ऊर्जा आहे. त्यासाठी कुणाचे भाषण ऐकुन आमच्यात उर्जा येते या गोष्टीवरचा आमचा विश्वास मुंडे साहेबा बरोबर संपला आहे . त्यामुळे भगवान गडाला ना कुणाच्या भावनिक भाषणाची ना समाजाला कुणाच्या भाषणातल्या उर्जेची गरज आहे असे वाटत नाही. तरीही काही लोकांना वाटत असेल आपण भाषण करावेच तर त्यांच्यासाठी पायथा उपलब्ध आहे. तुम्ही तिथे या पण भगवान गडाचे भक्त म्हणून वारसदार म्हणून नाही. एवढीच अपेक्षा पत्र लिहीणाराकडून व्यक्त करतो.
जय भगवान...जय गोपीनाथ
- संग्रहित लेख
1995 ला राज्यात सत्ता परिवर्तन झाले. गडाला राजकीय पाठबळ मिळाले. 1996 साली भगवान बाबांचे जन्मशताब्दी वर्षे होते. त्या निमित्ताने एक ऐतिहासिक अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला. ज्या सप्ताहाचे संपुर्ण नेतृत्व आजचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. वास्तवीक भिमसिंहबाबा यांनी या संपुर्ण कार्यक्रमाची सुत्रे शास्त्रीकडे दिली होती. या सप्ताहानंतर 1997 ला सावरगाव या बाबांच्या मुळ जन्मगावी पुन्हा एक सप्ताहा झाला. त्याचे नियोजक स्वत: मुंडे साहेबांनी शास्त्रीवर सोपवले होते. एकीकडे अध्यात्मिक बाबतीत गडाची किर्ती वाढत असतांना दुसरीकडे मात्र गडावरच्या राजकीय भुमीकेला महत्व येवु लागले होते. 1999 ला राज्यातली युतीची सत्ता गेली होती. परंतू लोकनेते मुंडे यांनी भगवान गडाच्या माध्यमातून संपुर्ण ऊस तोडणार्या समाजावर आपला प्रभाव निर्माण केला होता.
2003 साली नोव्हेंबर महिण्यात अचानक भिमसिंह बाबांचे आजारात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातल्या समाजाच्या मनात असलेल्या नामदेव शास्त्रींना सर्वा समक्ष या गादीचा वारसदार म्हणून तत्कालीन गडाच्या तत्कालीन कार्यकारी मंडळाने बसवल्याचे जाहीर केले या वेळी मुंडे साहेब गडाचे ट्रस्टी नव्हते. मात्र ते समाजाचे नेते झाले होते.त्यामुळे समाजाच्या वतीने मुंडे साहेबांनी शास्त्रींच्या नावाची घोषणा केली तेंव्हापासून आजपर्यंत या पदावर शास्त्रींच्या काळात जे दसरा मेळावे झाले. त्या दसरा मेळाव्या बद्दल एक वेगळे सामाजिक समिकरण आपल्याला पहावयास मिळू शकते. राज्यातील सत्ता गेली होती. सत्तेत असतांना भगवान गड हे माझे श्रध्दास्थान आहे असे साहेबांनी जाहीर केले होते. त्यामुळे एक भक्त म्हणून भगवान गडाच्या विकासात त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. भगवान बाबांनी अत्यंत कष्टातून उभ्या केलेल्या या गडाचा, गादीचा अथवा महंताचा अनादर होईल असे कधीही विधान केले नाही किंवा त्यांच्या समर्थकांनाही कधीच त्यांच्या परस्पर गडाबद्दल अथवा महंताबद्दल वाईट बोलण्याची हिम्मत केली नाही. त्यामुळे भगवानगड व गोपीनाथ मुंडे हे एक समिकरण बनले होते.
प्रत्येक वर्षी दसर्याच्या पंधरा दिवसा अगोदर गडावर कोणत्या पक्षाचा अथवा कोणत्या गटाचा, कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नेता आणायचा याचा संपूर्ण निर्णय स्वत: मुंडे साहेब घेत होते.काही दिवसांनी गडाची कार्यकारणी मंडळ मिटींग झाल्यास या गडाच्या ट्रस्टला अध्यक्ष म्हणून गोपीनाथ मुंडे हे न्याय देवु शकतील असा विश्वास डॉ.नामदेव शास्त्री यांना वाटला व त्यामुळे त्यांनी स्वत: लोकनेते मुंडे साहेबांना अध्यक्ष होण्यासाठी सुचना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भगवान गड हे मुंडे यांच्या बरोबरच राज्यात्ल्या अनेक लोकांचे श्रद्धेचे ठिकाण बनले. त्यांच्या अनेक भुमीका गडावरुन राज्यातल्या लोकांनी पाहिल्या . त्यांना कधी मुंबई दिसली कधी दिल्ली दिसली व शेवटच्या सभेत त्यांना स्वत:ची कन्याही दिसली व त्यांच्या प्रत्येक भुमीकेत गडाने कायम सकारात्मक विचार करीत त्यांना आशिर्वाद दिला. मुंडे साहेबांना गड एकतर्फी मदत करतो यामुळे इतर पक्षातल्या नेत्यांनी व त्या नेत्याबरोबर काम करणार्या समाजतल्या अनेक लोकांनी दसर्या दिवशी गडावर येणे बंद केले. गडाची प्रतिमा हळु हळु वंजारी समाजाचा गड अशीच बनली. या गोेष्टीचा प्रचंड त्रास महंतांना सहन करावा लागला. तरीही आपण योग्य मानसाच्या पाठीशी उभे आहोत या भुमीकेतून डॉ.नामदेव शास्त्री यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या भुमिकेचे समर्थन केले. परिणामी त्यांना त्याचा त्रासही सहन करावा लागला. गोपीनाथ मुंडे यांची उंची लक्षात घेतांना त्यांची व गडाची भक्ती लक्षात घेतांना त्यांचे भाषण राजकीय होते की, सामाजिक होते. यापेक्षा राज्यातल्या सर्व भागात आदरयुक्त भीतीचे होते हा मॅसेज गेल्यामुळे त्यांना सर्वांनी स्विकारले त्यांच्या आकाली जाण्याने मात्र आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
2014 च्या दसरा मेळाव्यात गडाने राजकीय फायदयासाठी गड वापरला म्हणून गडाच्या ट्रस्टीसह महंतावर गुन्हा दाखल झाला. तब्बल तीन महिणे महंत फरार होते. या काळात त्यांची साधी चौकशी करण्याची सुद्धा कुणाला गरज वाटली नाही. त्यानंतर गडाच्या विकासात आपले फार मोठे योगदान आहे. या अविरभावात काही लोकांनी गड म्हणजे आपली खाजगी मालमत्ता आहे ही भुमीका घेण्यास सुरुवात केली. परिणामी अत्यंत थंड डोक्याने भगवान गडाच्या कार्यकारी मंडळाने भगवान गडावर राजकीय भाषण बंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतांना महंताने वारसदारा बरोबर अनेक वेळा चर्चा केली. डिसेंबर 2015 साली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे, रावसाहेब दानवे यांच्या समक्ष भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथगडाला शुभेच्छा देवुन या नंतर राजकीय भुमीका या गडावरुन तर धार्मीक भुमीका भगवानगडावरुन ठरेल व त्यामुळे राजकीय कोंडीत सापडलेला भगवान गड मोकळा श्वास घेईल असे जाहीर केले होते. तेंव्हा हजारो बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवुन याचे स्वागत केले होते. मात्र प्रत्यक्ष दसरा जसा-जसा जवळ येवु लागला तस-तसा सोशल मिडीयावर काही लोकांनी वाद घालण्यास सुरुवा केली. दोन्ही नेतृत्वाने ठरवुन घेतलेला निर्णय असतांना हा वाद निर्माण का केला गेला हे लोकांना कळु शकले नाही. परिणामी गेल्या वर्षी दसर्याच्या अगोदर सहा महिण्यापुर्वी कोठारबन तालुका वडवणी या गावात झालेल्या वार्षीक नारळी सप्ताहात संपुर्ण राजकीय भाषण बंदी हा ठराव घेण्यात आला व तो आमलातही आणला गेला. या गोष्टीचा काही अंध भक्तांना प्रचंड राग आला व तब्बल पाच महिणे महंतांना खालच्या स्तरावर जावुन शिव्या देण्यात आल्या. वास्तविक वारसदाराने एक पोष्ट करुन हा चालेला सामाजिक गोंधळ थांबवु शकल्या असत्या मात्र आपले कडवे समर्थक कोणत्या टोकाला जावु शकता हे लोकांना दिसावे यासाठी प्रोत्साहन दिले. ठरावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व सामाजिक अस्थर्य निर्माण केले. परिणामी गडावर होणारा दसरा पायथ्यावर आला कार्यक्रमात बाहेरच्या लोकांना बोलवुन महंताला व या वादाशी संबंध नसलेल्या नेत्यांना शिव्या देण्यात आल्या एक वर्षात बरेच पाणी वाहुन गेले.
आता पुन्हा एकदा दोन दिवसावर दसरा आला आहे. गेल्या एक महिण्यापासून पुन्हा तोच विषय चर्चेत आणुन युवकांचे डोके भडकावले जावु लागले आहे. गेल्या वर्षी निघालेले मराठा मोर्चे, टप्प्यात आलेल्या नगर पालीका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, ओबीसी समाजात असुरक्षीतेची भावना या सर्व गोष्टीचा एकत्रीत मिलाप झाला व गडाच्या पायथ्याला लोक जमवण्यासाठी दसरा मेळाव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाड्याच्या गाड्या लावुन मानसे जमवण्यात आले आपल्या पाठीमागे फार मोठा जमाव आहे असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. त्याच वातावरणातून आजुन बाहेर निघाले नाही परिणामी यावर्षी पुन्हा असे काही करता येते का याचा प्रयत्न सुरु झाला. फार प्रयत्न करुनही वातावरण तापत नाही असे लक्षात आल्यानंतर युद्धात जिंकण्यासाठी वापरावयाचे शेवटचे हत्यार म्हणजे भावनीक वातावरण व आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातुनच अहंकारी भाषेतले पत्र महंतांना प्राप्त झाले आहे. ज्या पत्रातली भाषा मुलीने बापाला लिहीली असु शकत नाही तर सासरच्या त्रासाला वैतागलेली एकादी विवाहीता आत्महत्या करतांना या पद्धतीने पत्र लिहीते अशी ही भाषा आहे. त्या पत्रात ना भावनिक ओलाव आहे ना आत्मीक प्रेम समाजाच्या नावावर गेल्या तीन वर्षात कोणत्याच स्टेशनवर आथवा टॅक्सी स्टॅन्डवर न दिसलेला समाज या पत्रामुळे आम्हाला दिसला. ज्या गडावर भगवान बाबा आहे तीच समाजाची ऊर्जा आहे. त्यासाठी कुणाचे भाषण ऐकुन आमच्यात उर्जा येते या गोष्टीवरचा आमचा विश्वास मुंडे साहेबा बरोबर संपला आहे . त्यामुळे भगवान गडाला ना कुणाच्या भावनिक भाषणाची ना समाजाला कुणाच्या भाषणातल्या उर्जेची गरज आहे असे वाटत नाही. तरीही काही लोकांना वाटत असेल आपण भाषण करावेच तर त्यांच्यासाठी पायथा उपलब्ध आहे. तुम्ही तिथे या पण भगवान गडाचे भक्त म्हणून वारसदार म्हणून नाही. एवढीच अपेक्षा पत्र लिहीणाराकडून व्यक्त करतो.
जय भगवान...जय गोपीनाथ
- संग्रहित लेख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा