वारंवार धनंजय मुंडे साहेबांवर खलनायकीचे होणारे आरोप व त्यावरील निर्बुद्धीने केलेल्या प्रतिक्रिया या मला तर हास्यास्पद वाटतात.चला जरा जाणुन घेवु त्याबद्दल..
1-जे घरचे नाही झाले ते इतरांचे काय होणार? मला वाटत ह्या आरोपाचं खंडण तर साहेबांनी एक कर्तव्यनिष्ठ विरोधी पक्षनेता म्हणून केंव्हाच केलय. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सरकारदरबारी अभ्यासुपणे बाजु मांडून त्यांच निरसन होण्यासाठी सर्वतोपर प्रयत्न केलेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत.त्यामुळे इतरांचे काय होणार? या टीकेला पुर्णविराम इथेच मिळेल.
2-उभ्या हयातीत गोपीनाथ मुंडे ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्या पुतण्याने त्या पवार कुटुंबाशीच हातमिळवणी केली. या टीकेलातर मुख्य प्रचारपद्धती वापरुन काही जणांनी आपल्या राजकीय झोळ्या भरल्या. असो या टीकेची गोष्ट अशीच झाली कि द्रोणाने एकलव्याला गुरुदक्षिणेत अंगठा मागणे.आज आपण सांविधानिक युगात वावरतोय.भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेली स्वातंत्र्ये हि धनंजय मुंडे साहेबांला देखील तितकीच लागु होतात जितकी त्यांवर आरोपांचे ताशेरे ओढणार्यांना होतात. साहेबांनी कुठल्या पक्षात राहुन त्यांच्या सामाजिक कार्याला वळण द्यावे हा त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ठरतो. त्यात इतरांनी अनैतिक दखल देणे हे कितपत योग्य आहे.
कौटुंबिक सुखदुखाचे त्यांचे अधिकारांत इतरांनी राजकीय हव्यासापोटी व्यर्थ ढवळाढवळ करणे हि खेदात्मक गोष्टच मानावी लागेल. आज एक सांविधानिक पदावर कार्य करत असताना त्यांच्या कार्याची दखल संपुर्ण राज्याने घेतलीय. त्यामुळे निराकरण स्वतच प्रश्न न बनता त्यांच्या कार्यकर्तुत्वाला मान्य करणे हेच खरं जबाबी दायित्व होईल.सामाजिक मानसिकतेच्या बहुमताचंं पारडं त्यांच्याबाजुन आज कललेलं आहे केवळ राजकीय मतरुपी पारड्याची त्यात भरीची आवश्यकता आहे तेहि येणार्या काळात पहायला मिळेल.
- रा.उ.कदम (बीड)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा