मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

महाराष्ट्राचा उगवता सूर्य

                 धनंजय मुंडे हे नाव कानावर पडताच हिमलयातुन सूर्य उगवत  असताना सूर्यकिरणांची चोहिकडे जाशी लालिमा पसरते तसे  अष्टपैलू व्यक्तिमत्व घेवून सहेबच जणू आपल्या डोळ्यांसमोर  प्रत्यक्ष उभे राहतात.
           धनंजय मुंडे, आदरणीय पंडितआण्णा व रुक्मिणिबाई मुंडे यांच्या पोटी 15 जुलै 1975 रोजी जन्माला आलेले पुत्ररत्न .सहेबांचे बालपन नाथरा व परळीमधेच गेले त्यामुळे त्यांची नाळ परळीशी जोडली गेलेली आहे.सहेबांचे प्राथमिक शिक्षण परळीतील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले.महाविद्यालयीन शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय आणि त्यानंतर पदविचे शिक्षण (बॅचलर ऑफ सोशल लॉ) पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेजमधे पूर्ण केले.कॉलेज वयात असतानापसुनाची समजप्रतिची अपुलकिचि भावना यातून साहेब जवळपास 25 वर्षापासून परळीतिल आपल्या बांधावांसाठी काम करत आहेत.समजाप्रती आपले काही देने लागते या भावनेतुन समाजकार्य करण्यासाठी त्यांनी नाथ प्रतिष्ठानची स्थापना केली व आजपर्यंत विविध धर्मातील 1000 बहिणींचे लग्न लावून दिले. त्यामुळे त्यांना 1000 बहिणींचा भाऊ असे संबोधले जाते.फक्त राजकीयच नाही तर सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा असे कुठलेहि क्षेत्र त्यांनी सोडले नाही.स्वामी विवेकानंद क्रीडा प्रसारक मंडळाची स्थापना करून त्यांनी युवकांना प्रोत्साहित करण्याचे कम केले.याची दखल घेवून 2003 साली सहेबांची केंद्र सरकारच्या क्रीड़ा मंत्रायलच्या वतीने दिल्ली येथे आयोजित ऑटो एशियन गेम्स च्या संयोजन समितिवर निवड केलि गेली.शिक्षण क्षेत्रताहि त्यांनी नाथ शिक्षण संस्थेच्या रूपाने छोटेसे रोपटे लावले आहे त्याचेही भल्या मोठ्या वृक्षात नक्कीच रूपांतर होईल.
         राजकीय क्षेत्रातही त्यांनी पूर्वीपासूनच चांगला ठसा उमतवलेला आहे. 1995 च्या  विधानसभा निवडणुकीपासून सहेबांनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला.1997-98 साली भा. ज.यु. मो. विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रमुख हे पद त्यांनी भूषविले.18 फेब्रुवारी 2002 साली बीड जि. प. च्या पट्टीवडगाव गटातुन 300 मतानी विजयी झाले.त्यानंतर त्याच गटातुन 2007 साली तब्बल 1800 मतानी त्यांचा विजय झाला तेंव्हा त्यांची निवड बीड जि. प. उपाध्यक्षपदि करण्यात आली.या काळात त्यांनी जिल्ह्याच्या विकसासाठी कोटयावधी रुपयांचा निधि आणून विकासकामे केली. त्यानंतर 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी जाहिर केलि पण काही कारणामुळे ति डावलन्यात आली.त्यानंतर 10 जून 2010 साली त्यांची वर्णी विधानपरिषदेवर लागली.जुलै 2013 मध्ये त्यांनी भा. ज.पा. विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला व राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे निवडणूक लढवली व ते निवडून आले.विधानपरिषद सदस्य म्हणून काम करताना सभागृहात संपूर्ण राज्यभरातील  विविध प्रश्नांवर आवाज उठवला.याच काळात परळी मतदार संघात 150 कोटींची विकसकामे केली.2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला खरा पण म्हणतात न "जो होता है अच्छे के लिये होता है" याची प्रचिती जनतेला झाली.सहेबांची कार्यक्षमता पाहून डिसेंबर 2014 मध्ये शरद पवार यांनी विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सहेबांवर सोपावली व सर्वात तरुण विरोधीपक्ष नेता असा बहुमान त्यांना मिळाला.या पदाची जबाबदारी ओळखून त्यांनी आपले कार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. राज्यसरकारच्या विविध खात्यांत झालेल्या अपहराबद्दलची पुरव्यानिशि व मुद्देसूद मांडणी मग तो चिक्की घोटाळा असो ,महापुरुषांच्या प्रतिमा खरेदी घोटाळा असो वा औषध घोटाळा असो सर्व अपहारांची सभागृहात मांडणी केली. या काळात लोकांना कळले की, विधानसभेशिवाय विधानपरिषद हे ही एक सभागृह आहे.आज विधानपरिषद म्हंटल की,लोक म्हणतात धनंजय मुंडे वि. प. नेते आहेत तेच न ते सभागृह? तेंव्हा आम्ही कार्यकर्ते पण गर्वाने सांगतो की हो तेच ते सभागृह.आशा प्रकारे कमी काळातच साहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरले त्यामुळे परत 2016 साली विधानपरिषदेची उमेदवारी शरद पवर सहेबांनी धनंजय मुंडे सहेबांना दिली व साहेब कर्तृत्वाच्या जोरावर बिनविरोध निवडून विधानपरिषदेवर गेले.
  मतदार संघातील असो अथवा बहेरचा सहेबांकडे मदत मागायला गेला तर त्याला मदत नक्कीच मिळते. हळू हळू का होईना धनंजय नावाचे वारे सर्वत्र वाहु लागले आहे,तसेच लोकांचा विश्वासही त्यांनी संपादन केला आहे व त्या विश्वासास साहेब तडा जाऊ देणार नाहीत असा विश्वास आहे.
       
 - महेश गोविंद मुंडे, शिवाजीनगर परळी वै.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा