माझ्या लेखाला हे शिर्षक द्यायचं कारणही तसंच आहे , आतापर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या नेतृत्वाचे वेगवेगळे कॅलिबर ( Quality ) आपण पाहिल्या असतील उदाहरणअर्थ पवार साहेबांची धूर्त नीती , बाळासाहेब ठाकरेंची आक्रमक शैली , गोपीनाथ मुंडेंचा लोकसंग्रह , प्रमोद महाजनांचे वक्तृत्व इत्यादी पण हे सर्व गुण एकाच नेतृत्वात असू शकतात का हो ? होय निश्चितच जर आपण आतापर्यंत धनंजय मुंडेंविषयी जाणून असाल त्यांना पाहून , ऐकून असाल तर हे तुम्हालाही मान्य असेल..
तस पाहिलं तर धनंजय मुंडे हे चळवळीतून आलेले नेते आहेत, वयाच्या 18 व्या वर्षांपासून भाजपच्या विद्यार्थी आघाडीत ते सक्रिय झाले असले तरी धनंजय मुंडेंची राज्यव्यापी ओळख झाली ती डिसेंबर 2014 मध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यासच , त्यावेळी भरपूर राजकीय विश्लेषकानी त्यांची ही निवड केवळ त्यांच्या चुलत बहीण पंकजा मुंडेंना आव्हान एवढ्यातच तोलली पण डिसेंबर 2014 पासून आज ऑगस्ट 2017 ह्या जवळपास पावणेतीन वर्षांच्या कालावधीत धनंजय मुंडेंनी आपल्या सर्वगुणसंपन्न नेतृत्वाने ह्या सर्व बाजारबुणग्या विश्लेषकांची एकप्रकारे बोलतीच बंद केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही..
कारण मागच्या पावणेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या विरोधी पक्षनेता ह्या पदाच्या कारकीर्दीकडे आपण जर निरखून पाहाल तर आपल्यालाही ते समजेल , पहिलीगोष्ट मुंडेसाहेब सभागृहात बोलताना कधीच पुराव्याशिवाय बोलत नाहीत, सभागृहाच्या आवारात नेहमी त्यांच्याकडे काही दस्तावेज आपन पाहिलात तर आपल्याला त्यांच्या अभ्यासूपणाच दर्शन होईल , सभागृहाच्या आत आपण त्यांचे भाषण ऐकाल तर आपल्याला त्यांच्या वक्ता ह्या गुणासोबतच आक्रमक आणि निर्भीड पणा दिसून येईल हे झाले विधिमंडळातील गुण..
विधिमंडळाच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही मुंडे साहेब गेले तर त्यांच्या आजूबाजूला जमत असलेल्या गर्दीवरून आपल्याक त्यांचा लोकसंग्रह लक्षात येईल..
राजकारण करत असताना नित्तीमतेसोबतच व्यवहारही चोक ठेवावे लागतात हे हि तितकेच खरे, त्यातही मुंडे साहेब तरबेज ,
ह्याच नुकतच उदाहरण म्हणजे 3 महिन्यांपूर्वी झालेली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूकित बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असलेली प्रचंड प्रमाणातली गटबाजी ह्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले , मूळ वाद म्हणजे जेष्ठतेच्या तत्वानुसार बीड मध्ये धस आणि क्षीरसागर मुंडेंच नेतृत्व मान्य करायला तयार नव्हते , काहीही केलं तरी धनंजय मुंडेंना फक्त परळी लिमिटेड करायचं असा ह्यांचा डाव पण म्हणतात ना जातिवंत शिकार नेहमी योग्य वेळेच्या शोधात असतो हे काही खोट नाही , मुंडेंही एकप्रकारे राजकारणातले जातिवंत शिकारीच असल्याप्रमाणे ह्या वयस्कर मंडळींना कधी टिपायाचे हे ह्याची त्यांनी अत्यंत चोख अशी प्लॅनिंग केली ती जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत , ज्यामध्ये ह्या 2 नेतेमंडळींनी बंड करताच मुंडेंनी आपली म्यानातील तलवार बाहेर काढून एकप्रकारे ह्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शिरच्छेद केल्यासारखे पक्षातून बेधखल केले , आणि आष्टी आणि बीड मध्ये निर्माण झालेली पोकळी स्वतः सहित अमरसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागरांच्या रूपाने भरून दाखवून आपल्यातील राजकीय धुर्तपणाच एकप्रकारे दर्शन सर्वांना घडवून आणलं.
अश्याप्रकारे पवारसाहेब, बाळासाहेब , प्रमोद जी महाजण आणि गोपीनाथ मुंडे साहेब ह्यांचा पंगतीत धनंजय मुंडेंना बसवण्याची घाई मी लगेच करणार नाही पण ह्या युवा नेतृत्वातले गुण त्यांना ह्या पंगतीत काय ह्यापेक्षा उपर घेऊन गेले तरी आश्चर्य वाटायचं काही कारण नाही..!!
अश्या सर्वगुणसंपन्न , अष्टपैलू नेतृत्वाला माझ्याकडून भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
- आदित्य मुंडे , पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा