गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. महाराष्ट्राच्या राजकारणातील "बाहुबली"


     आताच भारताच्या सिनेसृष्टी मध्ये एका हिंदी सिनेमाने धूम उडवली होती आणि त्या सिनेमाच नाव अगदि छोट्या मुलापासून ते प्रौढव्यक्ती पर्यन्त पोहचल होत त्या तील मुख्य भूमिका करणारा बाहुबली आपल्या गरीब लोकांच समाजाच साम्राज्य टिकवण्या साठी कुठल्याही संकटाना समोर जात असतो ,
सांगण्याच तात्पर्य एवढंच कि अगदी त्याचाच रिमेक संध्या महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात घडतोय आणि धनंजय मुंडे हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली म्हणून त्यांच्या कडे पाहिल जात आहे , जसे की माहिष्मती साम्राज्याठि बाहुबली प्रत्येक गोष्टीला आव्हान देत असतो आगदि त्याच प्रमाणे धनंजय धनंजय मुंडे सध्या महाराष्ट्रातील जनतेसाठी व गरीब लोकांच साम्राज्य टिकवण्यासाठी एखाद्या संघर्षयोध्या प्रमाणे गरीब जनतेसाठी अगदी चोवीस तास हाडाची काड करतायत .
विरोधकांना जरी बाहुबली हे गौरव उद्गार आयकायला आवडत नसतील तरी सामान्य जनता मात्र आपुलकीने व आवडीने म्हणत आहेत की मुंडे हेच सर्व सामान्य व पीडित जनतेचे बाहुबली आहेत
ज्या प्रमाणे बाहुबली या फिल्म मध्ये एका गीतात म्हंटल कि
   "जय जय कारा जय जय कारा
   स्वामी देना तुम साथ हामारा "
   आता सर्व सामान्य जनता या गीताची जोडणी मुंडे यांच्या नावाला जोडून करत आहेत                                  "जय जय कारा जय कारा
धनंजयजी तुम देना साथ हामारा"
मंग तो समाज कुठलाही असो मराठा समाज असेल किंवा सकल ओ बी सी समाज असेल
      आताच झालेल्या मुंबई मंधील मराठा क्रांती मोर्च्या मंध्ये कोटींच्या वर मराठा बांधव सहभागी झाले होते . मराठा बांधव आपल्या आश्या अंकांशया व अपेक्षा या सर्व गोष्टींचं ओझ घेऊन मुंबईत दाखल झाला पण या निरबुद्धी सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याच काम केल ना. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या मोर्च्यात सहभाग नोंदवून आपण मराठा समाजाच्या पत्येक मागणी साठी संघर्ष करत आहे हे त्यांनी दर्शवल आहे व मराठा समाजाची कोणतेही मगणी पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी सभात्याग केला व आणखी आपण पुढे मराठा समाजाचा साठी संघर्ष चालूच ठेऊ यांचे संकेत त्यांनी दिले ...!!
        धनंजय मुंडे यांनी नेहमीच सत्याला साथ आणि अन्ययाला लाथ हा बाना त्यांच्या नसानसात भरला गेलेला आहे .
         मुंडे यांचा प्रत्येक महाराष्ट्र वासीयान साठी लढा थांबणार नाही आणि धनंजय मुंडे यांच नेत्रत्व कधीही सरकार समोर झुकणार नाही हे पण तितकंच महत्वाचं म्हणावं लागेल .
         धनंजय मुंडे या नावाची दहशत सध्या सरकारच्या  प्रत्येक मंत्र्या मध्ये चालू आहे कारण भ्रष्ट मंत्र्यांना वठणीवर आणण्याचं काम हे फक्त धनंजय मुंडे हेच करू  शकतात कारण दोन मंत्र्यांची  पोल खोल हि मुंडे यांनी केली आहे त्या मुळे त्यांची मंत्री पदे धोक्यात येण्याची शक्यता आहे
         वरील सर्व जनहितार्थ व लोक कामांमुळे मुंडे यांचा चाहता वर्ग खूप जास्त प्रमाणात निर्माण झाला आहे म्हणून धनंजय मुंडे या नावाची ओळख तरुणाई मध्ये आहे आणि मुंडे हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील" बाहुबली " आहेत  असे गौरव उद्गार बाहेर पडत आहेत आणि ते थेट विरोधकांच्या कानावर जाऊन आदळत आहेत ज्या प्रमाणे बाहुबली सिनेमा मध्ये " सत्याला साथ आणि अन्ययाला लाथ " हे चित्र पाहायला मिळाले त्याचाच रिमेक धनंजय मुंडे यांच्यात पाहायला मिळत आहे ....!!!!

  - राम गित्ते (नंदागौळकर)  मो नं.७७२१०१६५८१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा