गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. विरोधी पक्षातील कार्यकुशल नेतृत्व

या वर्षीचे पावसाळी अधिवेशन अनेक कारणाने गाजले या अधिवेशना मध्ये सरकाराच्या कारभार, सरकाराचे मंत्र्यांचे भ्रष्टाचार, पीकविमाच्या गोंधळ, शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, अशा अनेक कारणाने सभागृह गाजले
       या अधिवेशनाच्या काळात एक नेता अशा होता जो हिरा सारख्या चमकत होता. तो नेता म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. धनंजय मुंडे साहेब जे शेतकय्राचे पश्र असे मांडत होते कि जणू सभागृहात एखाद्या
शेतकरी बोलत असावा. सरकाराच्या Digital India मध्ये पीकविमाच्या गोंधळ तर सर्वानी
पाहिला 31 जूलै नंतर 70% लोकांचे पीक विमा भरणा राहिला होता मा. साहेबांच्या प्रयत्नामूळे सरकारने 5 आँगस्ट पर्यंत मूदत
वाढवून दिली पण त्यात हि सरकाराचे शेतकरी विरोधी धोरण आडवे आले ते असो
सभागृहात विरोधक सभात्याग ( सभागृह सोडून जाताना आपण अनेकदा बघितले ) पण सत्ताधारी पक्षाला सभागृह सोडून जाण्याची महाराष्ट्राच्या ( किंवा भारताच्या ) इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सरकार
वर हि वेळ फक्त आणि फक्त मा. धनंजय मुंडे साहेबांमूळेच आली. साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांची कशी दाणादाण उडताना संबध महाराष्ट्र पाहत होता.
‌                   महाराष्ट्रात काँग्रेस  पक्षाचे सूध्दा विरोधी पक्ष नेते आहेत पण त्यांचे नाव कुठे सूध्दा नसते. पण आदरणीय साहेबांच नाव
हे आख्या महाराष्ट्र भर गाजत आहे
तमाम महाराष्ट्र अधिवेशनाच्या काळात धनंजय मुंडे साहेब आज सभागृहात काय बोलले हे ऐकण्यासाठी उत्सूक असायचा.
 विरोधकांचा बुलंद आवाज
म्हणजेच  धनंजय मुंडे साहेब होय
‌विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधी मंडळात विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांचा एक अभ्यासू विरोधक म्हणून सत्काराचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडला होता,आणी तो एकमुखाने संमत होताना महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाच तोडीचा एव्हाना त्यापेक्षाही कार्यकुशल  नेता राष्ट्रवादीला गवसला आहे.
हे राष्ट्रवादीचं भाग्य म्हणावे लागेल.

- बबलू आडसूळ,अंबाजोगाई (9860348087) 

धनंजय मुंडे.. "इरादे विराट" लोगो के "हृदय सम्राट"


     महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांच्या हृदयाचे सम्राट म्हणून धनंजय मुंडे यांच्या कडे पाहिल जात आहे , कारण एकच लोकांचे कामे पूर्ण करण्याचे देह व उद्दिष्ट पूर्ण करणारा नेता म्हणजे धंनजय मुंडे ,
त्यांचे इरादे एखाद्या डोंगरा सारखे मोठे आणि विराट आहेत म्हणून धनंजय मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत खूप कमी काळात पोहचल , धनंजय मुंडे हे कुठल्याही समाजात दुजाभाव न करता प्रत्येक समान न्याय मिळावा या साठी आपला आवाज सरकार पर्यन्त पोहचवतात. 
धनंजय मुंडे यांचा सामान्य माणसाशी थेट संपर्क हाच त्यांचा महत्वाचा मुदा ठरतो म्हणून लोकांच्या मनात त्यांनी घर केलेले दिसून येत आहे .
मुंडे हे आता महाराष्ट्रात वेगळेच स्थान निर्माण केले आहे , मुंडे हे बीड जिल्ह्याची शान आहेतच पण आता हे नेत्रत्व मराठवाड्याची जान बनल आहे मुंडे हे विकासाचा झरा आणि राजकारणातील सापडलेला एक नवखा हिरा असे संबोधले जात आहे , मुंडे हे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा स्रोत बनले आहेत कार्यकर्त्यांन त्यांच प्रत्येक वेळी मार्गदर्शन लाभत असत , आणि मुंबई हुन आढवड्यातून वेळ काडून परळी येथे दोन दिवस थांबणे आणि कारकर्त्यांच्या अडचणींवर काऱ्यवाही करणे व भेट म्हणजे कार्यकर्त्यांन साठी नवसंजीवनी असते .
महत्वाचं म्हणजे गोपीनाथ मुंडे या नावानंतर राजकीय जादूगार हे धनंजय मुंडे आहेत आशे भाकीत महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांच्या वाणीतून बाहेर पडत आहे ,
स्वतःच्या करत्वने मिळवलेले विरोधी पक्ष नेते पद हे पद सध्याच्या परळी च्या आमदार यांना डोळ्यात टोचताना दिसतंय पण लाजवाब वकत्रत्वच्या जोरावर ढसा उमटवणारे कृतत्व हे धनंजय मुंडे यांच्या कडे दिसून येत आहे म्हणून त्यांची सर कोणालाच येणार नाही सध्या ते उत्तम प्रशासक व कुशाल संघटक करणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत मुंडे हे  छ. शिवाजी महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , सावरकर , महात्मा फुले , मोठ्या थोर पुरुषांच्या व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारा वर चालणारे व पुरोगामी महाराष्ट्राची स्वप्न पूर्णकरणार हिऱ्या सारखं नेत्रत्व लाभले आहे म्हणून त्यांच्या प्रसिद्धीचा वेग हा एखाद्या सुसाट वाऱ्यासारखा आहे , 
त्यांच्या या स्वतःच्या जीवावर मिळवलेल्या प्रसिद्धीच्या वेगाला कोणीही रोकू शकत नाही आणि भविष्यात रोकन कठीन बनल आहे हे नकीच .
महाराष्ट्राच्या गोर गरीब व दिंनदुबळया जनतेसाठी मुंडे यांचा संघर्षयाचा प्रवास चालूच आहे आणि या प्रवासात कितीही खडतर वळणे आली तरी मुंडे हे पाठीमागे सरणारे नसून ते हा प्रवास योग्य व न्याय देऊन पूर्ण करतील व येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला पुरोगामी वळण देतील हे नकीच.....!!

- राम गित्ते (नंदागौळकर) मो नं. ७७२१०१६५८१

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. सर्वगुणसंपन्न, अष्टपैलू नेतृत्व


माझ्या लेखाला हे शिर्षक द्यायचं कारणही तसंच आहे , आतापर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या नेतृत्वाचे वेगवेगळे कॅलिबर ( Quality ) आपण पाहिल्या असतील उदाहरणअर्थ पवार साहेबांची धूर्त नीती , बाळासाहेब ठाकरेंची आक्रमक शैली , गोपीनाथ मुंडेंचा लोकसंग्रह , प्रमोद महाजनांचे वक्तृत्व इत्यादी पण हे सर्व गुण एकाच नेतृत्वात असू शकतात का हो ? होय निश्चितच जर आपण आतापर्यंत धनंजय मुंडेंविषयी जाणून असाल त्यांना पाहून , ऐकून असाल तर हे तुम्हालाही मान्य असेल..
 तस पाहिलं तर धनंजय मुंडे हे चळवळीतून आलेले नेते आहेत, वयाच्या 18 व्या वर्षांपासून भाजपच्या विद्यार्थी आघाडीत ते सक्रिय झाले असले तरी धनंजय मुंडेंची राज्यव्यापी ओळख झाली ती डिसेंबर 2014 मध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यासच , त्यावेळी भरपूर राजकीय विश्लेषकानी त्यांची ही निवड केवळ त्यांच्या चुलत बहीण पंकजा मुंडेंना आव्हान एवढ्यातच तोलली पण डिसेंबर 2014 पासून आज ऑगस्ट 2017 ह्या जवळपास पावणेतीन वर्षांच्या कालावधीत धनंजय मुंडेंनी आपल्या सर्वगुणसंपन्न नेतृत्वाने ह्या सर्व बाजारबुणग्या विश्लेषकांची एकप्रकारे बोलतीच बंद केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही..
कारण मागच्या पावणेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या विरोधी पक्षनेता ह्या पदाच्या कारकीर्दीकडे आपण जर निरखून पाहाल तर आपल्यालाही ते समजेल , पहिलीगोष्ट मुंडेसाहेब सभागृहात बोलताना कधीच पुराव्याशिवाय बोलत नाहीत, सभागृहाच्या आवारात नेहमी त्यांच्याकडे काही दस्तावेज आपन पाहिलात तर आपल्याला त्यांच्या अभ्यासूपणाच दर्शन होईल , सभागृहाच्या आत आपण त्यांचे भाषण ऐकाल तर आपल्याला त्यांच्या वक्ता ह्या गुणासोबतच आक्रमक आणि निर्भीड पणा दिसून येईल हे झाले विधिमंडळातील गुण..
विधिमंडळाच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही मुंडे साहेब गेले तर त्यांच्या आजूबाजूला जमत असलेल्या गर्दीवरून आपल्याक त्यांचा लोकसंग्रह लक्षात येईल..
राजकारण करत असताना नित्तीमतेसोबतच व्यवहारही चोक ठेवावे लागतात हे हि तितकेच खरे, त्यातही मुंडे साहेब तरबेज ,
ह्याच नुकतच उदाहरण म्हणजे 3 महिन्यांपूर्वी झालेली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूकित बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असलेली प्रचंड प्रमाणातली गटबाजी ह्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले , मूळ वाद म्हणजे जेष्ठतेच्या तत्वानुसार बीड मध्ये धस आणि क्षीरसागर मुंडेंच नेतृत्व मान्य करायला तयार नव्हते , काहीही केलं तरी धनंजय मुंडेंना फक्त परळी लिमिटेड करायचं असा ह्यांचा डाव पण म्हणतात ना जातिवंत शिकार नेहमी योग्य वेळेच्या शोधात असतो हे काही खोट नाही , मुंडेंही एकप्रकारे राजकारणातले जातिवंत शिकारीच असल्याप्रमाणे ह्या वयस्कर मंडळींना कधी टिपायाचे हे ह्याची त्यांनी अत्यंत चोख अशी प्लॅनिंग केली ती जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत , ज्यामध्ये ह्या 2 नेतेमंडळींनी बंड करताच मुंडेंनी आपली म्यानातील तलवार बाहेर काढून एकप्रकारे ह्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शिरच्छेद केल्यासारखे पक्षातून बेधखल केले , आणि आष्टी आणि बीड मध्ये निर्माण झालेली पोकळी स्वतः सहित अमरसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागरांच्या रूपाने भरून दाखवून आपल्यातील राजकीय धुर्तपणाच एकप्रकारे दर्शन सर्वांना घडवून आणलं.
          अश्याप्रकारे पवारसाहेब,    बाळासाहेब , प्रमोद जी महाजण आणि गोपीनाथ मुंडे साहेब ह्यांचा पंगतीत धनंजय मुंडेंना बसवण्याची घाई मी लगेच करणार नाही पण ह्या युवा नेतृत्वातले गुण त्यांना ह्या पंगतीत काय ह्यापेक्षा उपर घेऊन गेले तरी आश्चर्य वाटायचं काही कारण नाही..!!

अश्या सर्वगुणसंपन्न , अष्टपैलू नेतृत्वाला माझ्याकडून भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

 - आदित्य मुंडे , पुणे

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे.. महाराष्ट्राच्या राजकारणातील "बाहुबली"


     आताच भारताच्या सिनेसृष्टी मध्ये एका हिंदी सिनेमाने धूम उडवली होती आणि त्या सिनेमाच नाव अगदि छोट्या मुलापासून ते प्रौढव्यक्ती पर्यन्त पोहचल होत त्या तील मुख्य भूमिका करणारा बाहुबली आपल्या गरीब लोकांच समाजाच साम्राज्य टिकवण्या साठी कुठल्याही संकटाना समोर जात असतो ,
सांगण्याच तात्पर्य एवढंच कि अगदी त्याचाच रिमेक संध्या महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात घडतोय आणि धनंजय मुंडे हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाहुबली म्हणून त्यांच्या कडे पाहिल जात आहे , जसे की माहिष्मती साम्राज्याठि बाहुबली प्रत्येक गोष्टीला आव्हान देत असतो आगदि त्याच प्रमाणे धनंजय धनंजय मुंडे सध्या महाराष्ट्रातील जनतेसाठी व गरीब लोकांच साम्राज्य टिकवण्यासाठी एखाद्या संघर्षयोध्या प्रमाणे गरीब जनतेसाठी अगदी चोवीस तास हाडाची काड करतायत .
विरोधकांना जरी बाहुबली हे गौरव उद्गार आयकायला आवडत नसतील तरी सामान्य जनता मात्र आपुलकीने व आवडीने म्हणत आहेत की मुंडे हेच सर्व सामान्य व पीडित जनतेचे बाहुबली आहेत
ज्या प्रमाणे बाहुबली या फिल्म मध्ये एका गीतात म्हंटल कि
   "जय जय कारा जय जय कारा
   स्वामी देना तुम साथ हामारा "
   आता सर्व सामान्य जनता या गीताची जोडणी मुंडे यांच्या नावाला जोडून करत आहेत                                  "जय जय कारा जय कारा
धनंजयजी तुम देना साथ हामारा"
मंग तो समाज कुठलाही असो मराठा समाज असेल किंवा सकल ओ बी सी समाज असेल
      आताच झालेल्या मुंबई मंधील मराठा क्रांती मोर्च्या मंध्ये कोटींच्या वर मराठा बांधव सहभागी झाले होते . मराठा बांधव आपल्या आश्या अंकांशया व अपेक्षा या सर्व गोष्टींचं ओझ घेऊन मुंबईत दाखल झाला पण या निरबुद्धी सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याच काम केल ना. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाच्या मोर्च्यात सहभाग नोंदवून आपण मराठा समाजाच्या पत्येक मागणी साठी संघर्ष करत आहे हे त्यांनी दर्शवल आहे व मराठा समाजाची कोणतेही मगणी पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी सभात्याग केला व आणखी आपण पुढे मराठा समाजाचा साठी संघर्ष चालूच ठेऊ यांचे संकेत त्यांनी दिले ...!!
        धनंजय मुंडे यांनी नेहमीच सत्याला साथ आणि अन्ययाला लाथ हा बाना त्यांच्या नसानसात भरला गेलेला आहे .
         मुंडे यांचा प्रत्येक महाराष्ट्र वासीयान साठी लढा थांबणार नाही आणि धनंजय मुंडे यांच नेत्रत्व कधीही सरकार समोर झुकणार नाही हे पण तितकंच महत्वाचं म्हणावं लागेल .
         धनंजय मुंडे या नावाची दहशत सध्या सरकारच्या  प्रत्येक मंत्र्या मध्ये चालू आहे कारण भ्रष्ट मंत्र्यांना वठणीवर आणण्याचं काम हे फक्त धनंजय मुंडे हेच करू  शकतात कारण दोन मंत्र्यांची  पोल खोल हि मुंडे यांनी केली आहे त्या मुळे त्यांची मंत्री पदे धोक्यात येण्याची शक्यता आहे
         वरील सर्व जनहितार्थ व लोक कामांमुळे मुंडे यांचा चाहता वर्ग खूप जास्त प्रमाणात निर्माण झाला आहे म्हणून धनंजय मुंडे या नावाची ओळख तरुणाई मध्ये आहे आणि मुंडे हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील" बाहुबली " आहेत  असे गौरव उद्गार बाहेर पडत आहेत आणि ते थेट विरोधकांच्या कानावर जाऊन आदळत आहेत ज्या प्रमाणे बाहुबली सिनेमा मध्ये " सत्याला साथ आणि अन्ययाला लाथ " हे चित्र पाहायला मिळाले त्याचाच रिमेक धनंजय मुंडे यांच्यात पाहायला मिळत आहे ....!!!!

  - राम गित्ते (नंदागौळकर)  मो नं.७७२१०१६५८१

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे..एक वादळ


     सध्या राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे नावाचं एक वादळ घोंगावतय आणि हे वादळ गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत हादरे देत आहे. २०१४ ला या देशात लाट आली आणि अनेकजण लाटेवर स्वार झाले. पण लाटेवर स्वार झालेल्यांचा निभाव आता वादळापुढे लागणार नाही. आता लाट ओसरली आहे आणि वादळ निर्माण झालेलं आहे. लाट वरून खाली आली होती, वादळ खालून वर चाललं आहे. लाटेच्या तडाख्यात अनेकांना घरी बसावं लागलं पण त्यांनी आता उभारी घेतली आहे. वादळाच्या तडाख्यात घरीच बसावं लागेल परत उभारी सुद्धा घेता येणार नाही. लाट २०१४ ला तयार झाली होती. पण वादळ हे २०१९ पूर्वीच तयार झालं आहे. आणि म्हणून २०१९ ला वादळा पुढे कुणाचाच टिकाव लागणार नाही.

विधानपरिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून ते आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. त्यांनी सरकार मधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासहित बाहेर काढले. पण या मंत्र्यावर कारवाई करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. पारदर्शक कारभाराचा बुरखा घालणार्‍या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी करोडो रुपयांचे घोटाळे केले आहेत. तरीही सरकार पारदर्शकतेचा आव आणित आहे. मुंडेंनी या सरकारच्या पारदर्शकतेचा बुरखा टराटर फाडला आहे.

कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, संपूर्ण शेतकरी कर्जमाफी अशा एकना अनेक समाजहिताच्या मुद्यांवर आवाज उठविला. त्यांनी अतिशय प्रभाविपणे हे मुद्दे विधान परिषदेत मांडले यावर चर्चाही घडवून आणली. वेळोवेळी सरकारचे लक्षही वेधून घेतले पण गेंड्याच्या कातडीचं सरकार असल्यामुळे या सरकारने अजून यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. मुंढेंनी सरकारला ठणकावून सांगितले आहे की, वरील मुद्यांवर आता चर्चा नको निर्णय घ्या निर्णय ..

 हे वादळ महाराष्ट्र तर काबीज करणारच आहे. पण दिल्ली सुद्धा हादरून सोडणार आहे. अशा अभ्यासू, हुशार, आक्रमक, समाजाप्रति तळमळ असणार्‍या वादळाची राष्ट्रवादीला आणि या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. धनंजय मुंडे यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेच्या मनात घर केलेलं आहे. धनंजय मुंडे हे विकासाचं वादळ आहे. आणि या वादळाचा झंझावात असाच सुरू राहिल, एवढं मात्र नक्की!

- अक्षय सोनवणे

रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे- एक "राजकीय मीडिया किंग"

               
     पावसाळी आधिवेशना मुळे मुंबईतील राजकीय वातावरण पावसाळ्यातही गरम आहे पर्यावणाच्या बाजूने विचार केला तर मुंबई आधीच दमट आणि उष्ण आहे पण या उष्णतेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे ना धनंजय मुंडे साहेबांनी या गरम अग्नीच्या झळा फक्त मुंबई पुरत्या राहिल्या नसून त्या झळा आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्या पर्यन्त पोहचल्या आहेत महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत " धनंजय मुंडे " यांनी आपल्या निर्भीड वक्ते पणामुळे आपली वेगळीच छाप पाडली आहे
सध्या न्यूज चॅनल वरती सर्वांची नजर पडतेय कारण मुंडे यांनी सभागृहात काय मुद्दे मांडले कोणाला पळून लावल कोणाला न्याय मिळवून दिला या कडे दररोज नजर जनतेची आहे .
महाराष्ट्राची जनता सध्या मनोरंजनात्मक टी  व्ही शो कडे पाट फिरवत आहेत आणि मुंडे यांची न्युज चॅनल वरती चरच्या सत्र खूप कुतूहलाने व आपल्या डोळ्याची पापणी खाली न पडू देता पाहत आहेत म्हणून लोकांच्या मनातून एकच शब्द बाहेर येत आहे सध्याचे "राजकीय मीडिया किंग " मुंडे हेच आहेत
लोकांच्या हातात रिमोटचे बटन ABP माझा, झी चोवीस तास , IBN लोकमत या चॅनल कडे वळण घेत आहेत .
 मंग चरच्या सत्र कुठल्याही विषयावर असो
 सध्या गाजत असलेल्या तथाकथित समृद्धी महामार्ग घोटाळा मंत्री प्रकाश मेहताचे SRA प्रकरण , पीकविमा भरण्यासाठी चालू असलेला गोंधळ आणि रत्नाकर गुटे यांच शेतकऱ्यांना फसवलेल प्रकरण इत्यादी गोष्टी आज धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधी मध्ये मांडून सरकारला आकक्षरश्याह एका पायावर्ती उभा केले मुंडेंचा आक्रमक पवित्रा पाहून काही मंत्री मोहद्याना चरच्या बॉक्स मधून उठुन जायची वेळ आली .
      कालच्या पवार साहेबान वरील कवितेने तर महाराष्ट्रातील लोकांची तर साहेबानी मने जिंकली ती कविता शब्दात पुन्हा एखादा
      " मी ना पहिले शिवाजी ना ऐकले यशवंत
       साहेब सानिध्य लाभले , मी ची खरा भाग्यवंत तुम्हा मुले मिळे मजला जण दरबारी
       मान्यता तुंम्हा सवे तुम्हा सेवी , मानतो मी धन्यता शून्य होतो शून्य आहे मी
       तुम्हा विना पुण्य हे गतजन्मीचे , माना अथवा न माना !!!!!
       साहेबानी वरील ओळी कथन केल्या वरील कवितेच्या वाचना नंतर एवढंच लक्ष्यात येईल की मुंडे हे फक्त राजकीय पुरुष नसून त्यांच भाषा विष्यबद्दलच प्रेम आणि पुरोगामी महाराष्ट्राचे विचार त्यांच्या मनामनात रुजलेले आहेत आणि धनंजय मुंडे हे आम्हा कार्यकर्त्यांचे एक राजकीय व सांस्कृतिक " विद्यापीठ" आहेत...!!!!

   - राम गित्ते  (नंदागौळकर ) मो.न.- ७७२१०१६५८१

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

गोपीनाथराव मुंडे ते धनंजय मुंडे

गोपीनाथरावजी मुंडे यांच्या भांडवलरुपी उत्तराधिकारी पंकजा मुंडेच पण राजकीय संघर्षरुपी वारसदार मात्र धनंजय मुंडे साहेबच.. एका कणखर नेतृत्वाची  राजकीय दिशा हि पूर्वापार घडलेल्या घटनांवर अवलंबित्त असते. त्यातुन निर्माण झालेले वास्तव आणि त्याच्याकडे समाजाचा डोळसपणा हा त्या व्यक्तित्वाला न्याय देणारा ठरतो. या लेखात देखील त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.

80 ते 90 च्या दशकात काँग्रेस च्या हाताचा पंजा लोकांच्या ह्रदयात होता अगदी रक्तात म्हणलात तरी चालेल मी 5 वर्षाचा असेल 91 ला. पण मला पक्क आठवत मी काँग्रेस चा झेंडा हातात घेऊन आमचा हाताचा पंजा म्हनून गावात फिरत होतो म्हणजे त्या वेळी काँग्रेस ची लोकप्रियता लोकां मध्ये अगदी लहान थोरा मध्ये किती भिनली  होती.... त्यातच इंदीरा गांधीं, राजीव गांधी यांच्या हत्येमुळं निर्माण झालेली प्रचंड सहानुभूती....त्यावेळी भाजप च कमळ म्हणलं कि पोटात कस तरीच होयच आपला हाताचा पंजाच बरा रे बाबा हि पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया कोणाच्याही तोंडी असायची.... बिलकुल या प्रवाहाच्या विरोधात एक माणूस हि लाट शांत करत होता समाजाच्या मनावर बिंबून बसलेला हाताचा पंजा पुसण्याचा आपल्या अफाट जिद्द मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्ती च्या जोरावर प्रयत्न करत होता त्यात समाजच मन वळवण्यात त्या माणसाला प्रचंड प्रमाणात यश आलं म्हणजे हाताचा पंजा सोडून दुसरं कोणतं चिन्ह ज्यांनी स्वप्नांत सुद्धा पाहिलं नसेल त्यांनी सुद्धा भाजप च कमळ स्वतःच्या मनावर कोरल ते फक्त एका व्यक्ती मूळ पर्यायानं समाजानं त्या व्यक्तीच नेत्रत्व निर्विवाद मान्य केलं आणि ती व्यक्ती होती स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब..!

      अगदी तीच परिस्थिती तसाच काळ तश्याच घटना तसाच एक लोकनेता आता आपलं स्वकर्तृत्व आणि अफाट मेहनत जिद्द या जोरावर संघर्ष करत आहे आणि त्या माणसाला आता भाजप च कमळ चिन्ह समाजाच्या मनावर जे बिंबून बसलंय ते पुसान्यात 70% यश आलंय..... आणि त्या माणसाच पुढच राजकीय भविष्य खूप उजवल आहे अगदी स्व.मुंडे साहेबासारखंच आतापर्यंत माझ्या सहीत सर्वच लोकांना जे चिन्ह एखादया शत्रू सारखं एखादा पापा सारखं वाटत होत तेच चिन्ह आज खूप प्रमाणात समाजानं स्वीकारलेलं दिसत आहे ह्याला फक्त एकच माणूस कारणीभूत आहे आणि त्या माणसाची मेहनत जिद्द... पर्यायानं समाज त्या माणसाच नेत्रत्व हळू हळू का होईना मान्य करत आहे. तो माणूस म्हणजे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते धनंजय_मुंडे
जो पक्ष जे चिन्ह आम्हाला अस्पसृश वाटत होत आज तेच आमची ओळख बनलंय हे फक्त धनंजय मुंडे यांच्यामुळंच...!
खरच धनुभाऊ तुम्ही ग्रेट आहात नक्कीच भविष्य तुमच्या यशापुढे लोटांगण घालत आहे.. आमचे स्व. मुंडे साहेब आम्हाला परत तुमच्या रूपाने मिळालेत...!!! 100% इतिहास परत त्याची पुनरावृत्ती करतो..!

 - नंदकिशोर मुंडे

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे- चाहता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा...!!!

सध्या राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वसामान्य नेत्रत्वा बाबत आनेक तर्क वितर्क लावले जात आहेत कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली व अनअपेक्षित निधनानंतर सर्वसामान्य जनतेची धुरा कोण सांभाळणार यावर मोठ प्रश्न चिन्ह निर्माण झालं होत काही काळा पुरत  अनेक नावे चर्चेत आली पण  नावाला पण ब्रेक लागल व भा ज पा सरकार तर्फे आता सर्वसामान्य नेत्रत्व चा चेहरा पंकजाताई मुंडे यांच्या कडे दिला पण तो अल्पकाळापुरता राहिला व त्यांच्याच पक्षाने जनतेला दाखवुन दिल कि पंकजा मुंडे हे नेत्रत्व सक्षम पने करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या कडून ओ बी सी मंत्रालय काढून घेऊन त्यांना घरचा आहेर दिला त्यानंतर सर्वसामान्य मराठवाड्यातील  जनतेची आशा आंकश्या कोण पूर्ण करणार या वर या  मोठ प्रश्नवाचक चिन्ह निर्माण झालं होत पण राजकीय क्षेत्रात एक चेहरा मराठवाड्यात बाकी होता राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील ओ बी सी व सर्वसामान्य जनतेला नेत्रत्व मान्य असणार नाव म्हणजे ना धनंजय मुंडे हे नाव निर्भीड पने लोक सध्या त्यांच्या ओढातुन बाहेर पडत आहे असे सरळ पने दिसून येत आहे आता महाराष्ट्रातील जनतेला पण समजल कि वरील सर्व पर्याय संपल्या नंतर फक्त धनंजय मुंडे च निर्भीड पने विकासाची कार्यवाही करू शकतात ना कुणाचे दडपण व ना कुणाचा दबाव आशे एकमेव व्यक्तिस्वतत्र्य असलेले नेते म्हणजे ना धनंजय मुंडे साहेब हे नाव सध्या महाराष्ट्रातल जनतेच्या ओठातून पूर्ण महाराष्ट्रभर बाहेर पडत आहे सध्याची शेतकऱ्यांची परिस्थती लक्ष्यात घेता शेतकऱ्यावर गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे .
          भा. ज .पा. सरकारने अगदी गाजवजात चालू केलेली प्रधानमंत्री फसल बिमा योजना हि फसलेली बिमा योजना आहे हे ना धनंजय मुंडे यांनी दाखून दिले आहे मागच्या पंधरा दिवसात शेतकरी नरक वासना भोगतयात कारण सरकार प्रत्येक दिवसाला हे सरकार रंग बदलू गिरगीटा सारख रंग बदलतंय पण या रंग बदलू गिरगीटाचा एकच रंग कायम ठेवण्या साठी धनंजय मुंडे हे नेत्रत्व सक्षम आहे हे त्यांनी खरीप हंगाम पीक विमा मुदत वाढवून घेऊन समदं महाराष्ट्राला दाखून दिल .
          पीक विम्याच्या मुदत वाठीबद्ल त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून सरकारने त्यांच्या समोर नांगी टाकून दिली आणि पाच दिवसाची मुदत वाढ सरकारने दिली म्हणून आज धनंजय मुंडे साहेबान मुळे लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे आश्या जणहिता च्या कामामुळे सध्याच परळी मतदार संघाच्या मावळत नेत्रत्वला जनता योग्य ती जागा येणाऱ्या विधानसभा निवडणुकांन मध्ये दाखवेल यात शंका नाही . आताच पार पडलेल्या जि प व पंचायत समितीच्या निवडणुकांन मध्ये परळी मतदार संघाच्या जनतेनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मंत्री मोहद्याना दिवसा चांदणे दिसण्याची वेळ आली आहे .
     वरील कामांन मुळे धनंजय मुंडे हे नेते मराठवाड्याच नाहीत तर विदर्भ , खान्देश, पश्चिम महाराष्ट्र , कोकण , या कडे विस्तार होत आहे म्हणून ते महाराष्ट्राचे नेते आहेत हे दिसून येत आहे
      धनंजय मुंडे या नावाचा न थांबणार वादळ  रोकन कठीण बनल आहे आणि हे वादळ पूर्ण महाराष्ट्र भर नाही तर भविष्यात पूर्ण भारतभर गोंगावल्या शिवाय राहणार नाही.
   लेखणीच्या शेवटी जाताजाता एवढच निष्कर्ष काढेल कि धनंजय मुंडे यांची ताकद कुठल्याही शस्त्राच्या किंवा आस्त्राच्या जिवावर धजलेली नाही त्यांची क्रांती  लोकांच्या मनामंनात रुजलेली आहे.

- राम गित्ते (नंदागौळकर) मो नं : ७७२१०१६५८१

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

धनंजय मुंडे - मरगळलेल्या विरोधकांतील बुलंद आवाज


विधान परिषदेच्या इतिहासात प्रथमच सत्ताधार्यांनी शोधली पळवाट..

आज विधान परिषदेचे कामकाज सुरु झालेकिच विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे साहेबांनी सरकारला राज्यात सध्या गाजत असलेल्या तथाकथित समृद्धी महामार्ग घोटाळा, मंत्री प्रकाश मेहतांचे SRA प्रकरण , पीकविमा भरण्यासाठी चालू असलेला गोंधळ आणि रत्नाकर गुट्टे च शेतकऱ्यांना फसविलेले प्रकरण इत्यादी गोष्टी आज साहेबांनी लक्षवेधी मध्ये मांडून सरकारला अक्षरशः झोडपुन काढले ,साहेबांचा आक्रमकपणा पाहून सरकारमधील सर्व प्रतिनिधी अक्षरशः सभागृहातून उठून पळाले.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विधी मंडळात विरोधी पक्ष नेते नारायण राणे यांचा एक अभ्यासू विरोधक म्हणून सत्काराचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडला होता,आणी तो एकमुखाने संमत होताना महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाच तोडीचा विरोधी पक्षनेता म्हणून धनंजय मुंडे नावाचा अभ्यासू नेता विरोधकांना गवसला आहे.विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांना निशब्द करून सदन सोडायला लावणारा नेता म्हणून धनंजय मुंडेंची नोंद  इतिहासात घेतली जाणार.आक्रमक भाषेला अभ्यासाची जोड देऊन संयत भाषेत सवाल उपस्थित करण्याची किमया धनंजय मुंडेंना अवगत आहे.याचा प्रत्यय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या खडाजंगीत आली होती.तेव्हा मुख्यमंत्र्यांना गप बसावे लागले होते, आणि याच किमयाच्या जोरावर आज सत्ताधाऱ्यांचे दात त्यांच्याच  घशात घातले.
भाजप मध्ये असताना कदाचित याच टॅलेंटची कदर झाली नाही,इकडे एक संधी मिळाली.आणि संधीचा वारू इतका उधळला की यांच्या भाषणाने परिषद अवाक झाली. विशेष म्हणजे  स्वतःच्या जातीपलीकडे विचार करून सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा परिषदेत वाचा फोडली.हे वैशिष्ट्यगुण येत्या काळात धनंजय मुंडे राज्याचा नेता होण्यास पूरक ठरतील.विरोधक जेव्हा सत्तेत जातात तेव्हा ते विरोधक असतानाचा आव विसरत नाही याचे बरेचसे उदाहरण सध्या दिसतील.पण मला खात्री आहे की धनंजय मुंडे यांच्याबद्दल असे होणार नाही.जेवढे विरोधक म्हणून ते सध्या कारकीर्द गाजवत आहे , तितकेच ते सत्तेत आल्यावर देखील लोकांचे तत्परतेने काम करतील.
तूर्तास आज तरी धनंजय मुंडेंनी इतिहास घडविला आहे.त्यांना शुभेच्छा .

- प्रतिक शिवाजीराव पाटील

मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

महाराष्ट्राचा उगवता सूर्य

                 धनंजय मुंडे हे नाव कानावर पडताच हिमलयातुन सूर्य उगवत  असताना सूर्यकिरणांची चोहिकडे जाशी लालिमा पसरते तसे  अष्टपैलू व्यक्तिमत्व घेवून सहेबच जणू आपल्या डोळ्यांसमोर  प्रत्यक्ष उभे राहतात.
           धनंजय मुंडे, आदरणीय पंडितआण्णा व रुक्मिणिबाई मुंडे यांच्या पोटी 15 जुलै 1975 रोजी जन्माला आलेले पुत्ररत्न .सहेबांचे बालपन नाथरा व परळीमधेच गेले त्यामुळे त्यांची नाळ परळीशी जोडली गेलेली आहे.सहेबांचे प्राथमिक शिक्षण परळीतील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले.महाविद्यालयीन शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय आणि त्यानंतर पदविचे शिक्षण (बॅचलर ऑफ सोशल लॉ) पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेजमधे पूर्ण केले.कॉलेज वयात असतानापसुनाची समजप्रतिची अपुलकिचि भावना यातून साहेब जवळपास 25 वर्षापासून परळीतिल आपल्या बांधावांसाठी काम करत आहेत.समजाप्रती आपले काही देने लागते या भावनेतुन समाजकार्य करण्यासाठी त्यांनी नाथ प्रतिष्ठानची स्थापना केली व आजपर्यंत विविध धर्मातील 1000 बहिणींचे लग्न लावून दिले. त्यामुळे त्यांना 1000 बहिणींचा भाऊ असे संबोधले जाते.फक्त राजकीयच नाही तर सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा असे कुठलेहि क्षेत्र त्यांनी सोडले नाही.स्वामी विवेकानंद क्रीडा प्रसारक मंडळाची स्थापना करून त्यांनी युवकांना प्रोत्साहित करण्याचे कम केले.याची दखल घेवून 2003 साली सहेबांची केंद्र सरकारच्या क्रीड़ा मंत्रायलच्या वतीने दिल्ली येथे आयोजित ऑटो एशियन गेम्स च्या संयोजन समितिवर निवड केलि गेली.शिक्षण क्षेत्रताहि त्यांनी नाथ शिक्षण संस्थेच्या रूपाने छोटेसे रोपटे लावले आहे त्याचेही भल्या मोठ्या वृक्षात नक्कीच रूपांतर होईल.
         राजकीय क्षेत्रातही त्यांनी पूर्वीपासूनच चांगला ठसा उमतवलेला आहे. 1995 च्या  विधानसभा निवडणुकीपासून सहेबांनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला.1997-98 साली भा. ज.यु. मो. विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रमुख हे पद त्यांनी भूषविले.18 फेब्रुवारी 2002 साली बीड जि. प. च्या पट्टीवडगाव गटातुन 300 मतानी विजयी झाले.त्यानंतर त्याच गटातुन 2007 साली तब्बल 1800 मतानी त्यांचा विजय झाला तेंव्हा त्यांची निवड बीड जि. प. उपाध्यक्षपदि करण्यात आली.या काळात त्यांनी जिल्ह्याच्या विकसासाठी कोटयावधी रुपयांचा निधि आणून विकासकामे केली. त्यानंतर 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी जाहिर केलि पण काही कारणामुळे ति डावलन्यात आली.त्यानंतर 10 जून 2010 साली त्यांची वर्णी विधानपरिषदेवर लागली.जुलै 2013 मध्ये त्यांनी भा. ज.पा. विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला व राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे निवडणूक लढवली व ते निवडून आले.विधानपरिषद सदस्य म्हणून काम करताना सभागृहात संपूर्ण राज्यभरातील  विविध प्रश्नांवर आवाज उठवला.याच काळात परळी मतदार संघात 150 कोटींची विकसकामे केली.2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला खरा पण म्हणतात न "जो होता है अच्छे के लिये होता है" याची प्रचिती जनतेला झाली.सहेबांची कार्यक्षमता पाहून डिसेंबर 2014 मध्ये शरद पवार यांनी विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सहेबांवर सोपावली व सर्वात तरुण विरोधीपक्ष नेता असा बहुमान त्यांना मिळाला.या पदाची जबाबदारी ओळखून त्यांनी आपले कार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. राज्यसरकारच्या विविध खात्यांत झालेल्या अपहराबद्दलची पुरव्यानिशि व मुद्देसूद मांडणी मग तो चिक्की घोटाळा असो ,महापुरुषांच्या प्रतिमा खरेदी घोटाळा असो वा औषध घोटाळा असो सर्व अपहारांची सभागृहात मांडणी केली. या काळात लोकांना कळले की, विधानसभेशिवाय विधानपरिषद हे ही एक सभागृह आहे.आज विधानपरिषद म्हंटल की,लोक म्हणतात धनंजय मुंडे वि. प. नेते आहेत तेच न ते सभागृह? तेंव्हा आम्ही कार्यकर्ते पण गर्वाने सांगतो की हो तेच ते सभागृह.आशा प्रकारे कमी काळातच साहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरले त्यामुळे परत 2016 साली विधानपरिषदेची उमेदवारी शरद पवर सहेबांनी धनंजय मुंडे सहेबांना दिली व साहेब कर्तृत्वाच्या जोरावर बिनविरोध निवडून विधानपरिषदेवर गेले.
  मतदार संघातील असो अथवा बहेरचा सहेबांकडे मदत मागायला गेला तर त्याला मदत नक्कीच मिळते. हळू हळू का होईना धनंजय नावाचे वारे सर्वत्र वाहु लागले आहे,तसेच लोकांचा विश्वासही त्यांनी संपादन केला आहे व त्या विश्वासास साहेब तडा जाऊ देणार नाहीत असा विश्वास आहे.
       
 - महेश गोविंद मुंडे, शिवाजीनगर परळी वै.