स्व. गोपीनाथ मुंडे साहेब या माझ्या विचारमंथनातुन तुम्हाला अखेरची वैचारिक श्रद्धांजली.
साहेब आम्ही चुकलो.मुकलोत अगदी त्या नेतृत्वाला जे बहुजन समाजाचे भविष्य होते. तुमच्या अंतरात्रीची पीडा आम्हालाही तितकीच आहे जितकी आपल्याला होती. किती स्वप्न साठवून ठेवली होती तुम्ही मराठवाड्याच्या उषःकालासाठी.. पण डाव नियतीने कायमस्वरूपी मोडला तो आजतागायत पुनर्रचनेसाठी धाव घेत नाही.तुमची दुसर्यादिवशीची घोषणा ऐकण्यासाठी आजही आमचे कान प्रतिक्षेत आहेत.आपल्या निर्मळ अंतकरणातुन तयार झालेला विकासआराखडा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी कासावीस जीव आजही प्रतिक्षेत आहेत. उत्तर सापडत नाही विकासआराखड्याबाबतीत आजही.. कि ते नाहीसे झाले कि जाळले गेले. पण आपली उणीव मात्र भासते.
नेतृत्व निवडीबाबत आपल्या मताशी आपले सर्व अनुयायी एकमत होते.. परंतु आपल्या शेवटच्या श्वासापर्यंतच... तिथुन पुढचा काळ साहेब आम्हाला काळरात्री प्रमाणे गेला. आपण ज्या मातृत्व, दातृत्वाच्या गोष्टी आमच्याशी केल्या ते पेलणार नेतृत्व आम्हाला सापडेना. आपण ज्या पक्षात राहुन तिथली व्यवस्था उभ्या जन्मी आपण मान्य केली नाही. त्या पक्षातील नवउमेदी लोकांनी आमच्या खांद्यावर पंकजाताईंची पताका दिली. अगदी सांगायचेच झाले तर आपल्या पोटच्या गोळ्याला आम्ही कसे फितुर होवु. म्हणुन इमानेइतबारे सेवा करण्याची संधी चुकवली नाही. पण साहेब आता सगळ बदललं आहे. तुम्हाला मान्य नसलेली व्यवस्था समाजात रुजवण्यात ताई कुठलीच कसर करत नाहीत.
नाविलाजे कुठेतरी तुमच्या विचारांचे पाईक असलेले आम्ही बंड करुन तुमचच प्रतिरुप असणारे धनंजय भाऊ यांचे पाईक झालोत. निष्ठाही तिथेच आहे फक्त विचारमुल्ये बदलली. जेकि आपण आम्हाला सांगितलेली आहेत.त्यांच्यात आम्हाला गोपीनाथ मुंडे दिसतात जे गोपीनाथ मुंडे व्यवस्था परिवर्तनासाठी ओळखले जातं. नाविलाज आहे साहेब.. पक्षापेक्षा आम्हाला तुमचे विचार जीवंत ठेवायचे आहेत.
पुन्हा एकदा माफी मागतो..
- रा.उ.कदम ( बीड)
साहेब आम्ही चुकलो.मुकलोत अगदी त्या नेतृत्वाला जे बहुजन समाजाचे भविष्य होते. तुमच्या अंतरात्रीची पीडा आम्हालाही तितकीच आहे जितकी आपल्याला होती. किती स्वप्न साठवून ठेवली होती तुम्ही मराठवाड्याच्या उषःकालासाठी.. पण डाव नियतीने कायमस्वरूपी मोडला तो आजतागायत पुनर्रचनेसाठी धाव घेत नाही.तुमची दुसर्यादिवशीची घोषणा ऐकण्यासाठी आजही आमचे कान प्रतिक्षेत आहेत.आपल्या निर्मळ अंतकरणातुन तयार झालेला विकासआराखडा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी कासावीस जीव आजही प्रतिक्षेत आहेत. उत्तर सापडत नाही विकासआराखड्याबाबतीत आजही.. कि ते नाहीसे झाले कि जाळले गेले. पण आपली उणीव मात्र भासते.
नेतृत्व निवडीबाबत आपल्या मताशी आपले सर्व अनुयायी एकमत होते.. परंतु आपल्या शेवटच्या श्वासापर्यंतच... तिथुन पुढचा काळ साहेब आम्हाला काळरात्री प्रमाणे गेला. आपण ज्या मातृत्व, दातृत्वाच्या गोष्टी आमच्याशी केल्या ते पेलणार नेतृत्व आम्हाला सापडेना. आपण ज्या पक्षात राहुन तिथली व्यवस्था उभ्या जन्मी आपण मान्य केली नाही. त्या पक्षातील नवउमेदी लोकांनी आमच्या खांद्यावर पंकजाताईंची पताका दिली. अगदी सांगायचेच झाले तर आपल्या पोटच्या गोळ्याला आम्ही कसे फितुर होवु. म्हणुन इमानेइतबारे सेवा करण्याची संधी चुकवली नाही. पण साहेब आता सगळ बदललं आहे. तुम्हाला मान्य नसलेली व्यवस्था समाजात रुजवण्यात ताई कुठलीच कसर करत नाहीत.
नाविलाजे कुठेतरी तुमच्या विचारांचे पाईक असलेले आम्ही बंड करुन तुमचच प्रतिरुप असणारे धनंजय भाऊ यांचे पाईक झालोत. निष्ठाही तिथेच आहे फक्त विचारमुल्ये बदलली. जेकि आपण आम्हाला सांगितलेली आहेत.त्यांच्यात आम्हाला गोपीनाथ मुंडे दिसतात जे गोपीनाथ मुंडे व्यवस्था परिवर्तनासाठी ओळखले जातं. नाविलाज आहे साहेब.. पक्षापेक्षा आम्हाला तुमचे विचार जीवंत ठेवायचे आहेत.
पुन्हा एकदा माफी मागतो..
- रा.उ.कदम ( बीड)